Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर नुकतीच जोरदार टीका केली होती. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असे म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला होता ते पुढे म्हणाले,’लाठीमार झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन झोपले होते. त्यांना आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार यांनी रात्री तीन वाजता घरातून उठवून आणलं आणि आंदोलन करण्यासाठी बसवलं. शरद पवार आंदोलनस्थळी येणार आहेत, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनाही तिथे आणलं,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला’ आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
रोहित पवार म्हणाले,’छगन भुजबळ हे स्वत: मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा योग्य वापर करता येत नसेल, या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: यावर स्पष्टीकरण देईन,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
तत्पूर्वी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असे म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेंवर टीका केली होती.