Manoj Jarang patil | Maharashtra Government : मराठा समाजाचा संघर्ष लक्षात घ्या, तुम्ही काय राजकारण करायचे ते करा, परंतु आमची मुले मोठी झाली पाहिजेत. एवढाच माझा उद्देश आहे. आता तातडीने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा तुमचा सुपडा साफ झाल्या शिवाय राहणार नाही. सरकारच्या विरोधात तब्बल ९०० एकरांवर न भूतो न भविष्यती अशी सभा घेणार असल्याचे मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांनी इशारा दिला.
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील अश्वलिंग देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगते प्रसंगी शनिवारी मनोज जरांगे यांनी दर्शन घेतल्यानंतर जवळ तयार करण्यात आलेल्या सभास्थळी पावणे एकच्या दरम्यान जाहीर सभा घेतली.
या वेळी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सध्या आत्याच्या भूमिकेत आहेत. ते पोलिसांचे कान फुंकून मराठ्यांनाअटक करण्याचे आदेश देत आहेत. मनोज जरांगे हे १० मार्च व ११ मार्च असे दोन दिवस परभणी जिल्ह्यात ५ ठिकाणी संवाद बैठका घेणार आहेत.
आम्हाला निवडणूक व राजकारणातकोणताही रस नाही. नोकर भरतीप्रक्रिया १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. येत्या काळात ९००,एकरवर सभा घेऊन मराठा काय आहे हे दाखवू, असा इशारा मनोज जरांगे यांनी भाषणातून राज्य सरकारला दिला.