नवी दिल्ली – ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकरांनी देखील या संपूर्ण घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे आणि रिचा चड्ढा यांनी ट्वीट करत मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
अश्यातच, आता बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार ‘जया बच्चन’ यांनी आता या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन म्हणाल्या की, “या घटनेचा पूर्ण व्हिडीओ त्या पाहू शकल्या नाहीत, त्यांना खूप वाईट वाटलं…’ यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी पूर्ण व्हिडीओ बघू शकले नाही. मला खूप वाईट वाटले, खूप लाजही वाटली.
#WATCH | Delhi: I felt so bad, I couldn’t see the entire video. I was ashamed. Nobody cares. Women are being treated so badly. Its very frustrating. Everyday something or the other is happening with women. It’s very saddening: Jaya Bachchan, Rajya Sabha MP on Manipur Incident pic.twitter.com/C748G8kGx0
— ANI (@ANI) July 20, 2023
ही घटना मे महिन्यामध्ये घडली आणि आता व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण याबद्दल कुणीही एक शब्दाची सहानुभूती दाखवली नाही. हे खूप निराशाजनक आहे. रोज काही ना काही घडतं आहे. उत्तर प्रदेशबद्दल तर बोलायलाच नको. संपूर्ण देशात हे काय चालले आहे? महिलांचा एवढा अपमान… हे अत्यंत वाईट आहे.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.