माणसे आणि त्यांच्यातील नातेसंबंध हा खूप गुंतागुंतीचा विषय असतो. माणसांचे अनेक प्रश्न, समस्या या एकमेकांचा आदर न केल्याने, एकमेकांशी संवाद न साधल्यामुळे निर्माण होत असतात आणि आपलीच माणसे आपले शत्रू होण्याइतपत परिस्थिती चिघळत जाते. पण बोलणार कसे आणि कुणाजवळ? अशा सर्वांसाठी आशेचा किरण ठरली आहे माउलींच्या अलंकापुरीतातील वंदना प्रफुल्ल सोनवणे या “माउली’ची “माणिकरत्न मल्टीपर्पज सोशल सोसायटी’.
विधवा, पती/पत्नीच्या अत्याचाराने ग्रासलेली स्त्री/पुरुष असो, वयोवृद्ध, वंचित, ग्रासलेल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, कायदेशीर, सरकारीसह हरप्रकारची मदत मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने “नवसंजीवनी’ ठरणाऱ्या “माणिकरत्न’च्या संस्थापक अध्यक्षा वंदना सोनवणे या नवदुर्गा ठरल्या आहेत.
हतबलता, एकटेपणा, मनोधैर्य गमावल्याने आलेली निराशा, मनाचा कोंडमारा हा अनुभव
वंदना सोनवणे यांना नित्याचा आहे. प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडितांना दिलासा देण्याची किमया “माणिकरत्न’च्या माध्यमातून वंदना सोनवणे देत आहेत.
वंदना सोनवणे या उच्च शिक्षित असून त्यांनी बीए, एमएसडब्ल्यूची पदवी घेतली आहे. सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना वडील माणिक गायकवाड यांच्या माध्यमातूनच मिळाले असून लग्न झाल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून त्यास प्रोत्साहन मिळत असल्याने गोरगरिबांसाठी झटण्यास एकप्रकारे बळच मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
वंदनाताई यांनी 2010मध्ये “माणिकरत्न’संस्थेची स्थापना करून शेकडो जोडप्यांना पुन्हा एकत्र नांदवण्यासाठी, मुलांना आई-वडिलांची काठी बनण्यासाठी तसेच बेरोजगारांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी जे-जे प्रयत्न करणे शक्य असेल ते सगळे प्रयत्न आजही अविरतपणे करीत आहेत. या कार्यात त्यांना त्यांचे पती प्रफुल्ल अर्जुन सोनवणे, मुलगा ऍड. प्रियेश सोनवणे, सून शीतल सोनवणे यांच्यासह संस्थेतील सात जणांसह असंख्य स्वंयसेवकांच्या (व्हॉलिटियरस) माध्यमातून मदतीचा हात मिळत असून दिवसेंदिवस हे हात वाढतच आहेत.
या संस्थेद्वारे वंदनाताईंनी घरगुती कामगार क्षेत्र कौशल्य परिषद (ऊथडडउ ऊोशीींळल थीेज्ञशीी डशलीीें डज्ञळश्रश्र र्उीेपलळश्र) या शासनाच्या योजनेतून हजारो कामगारांना रोजगाराच्या वाटा मिळवून दिल्या आहेत. तसेच खास प्रशिक्षणाचे आयोजन करून या कामगारांना त्यांच्या कार्यात निपूण करून त्यांना प्रमाणपत्रही देतात. उत्तरप्रदेशातील हाथरस सारख्या घटना रोखण्यासाठी तसेच युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचे गटकरून त्यांना विशेस ट्रेनिंगही संस्थेमार्फत दिले जात आहे.
त्याचबरोबर आतापर्यंत 2500 ते 3000 महिला आमच्या सोबत जोडल्या गेल्या असून त्यांना मदत्तीचा हातथही दिला गेला आहे. यापुढील काळात बॅंक, पतसंस्था उभारण्याचाही आमचा मानस असल्याचे वंदना सोनवणे यांनी सांगितले. सध्या वंदनाताई “ब्रेस्ट कॅन्सर’शी झुंजत आहेत.
त्यामुळे कॅन्सर रुग्णाच्या हाल ते जाणून असल्याने त्यांना मदत करण्यासाठी ते सरसावल्या आहेत. पण स्वत:वर इलाज सुरू असल्याने इतर कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी अडचणी येत आहेत. तरी दानशूर व्यक्ती व कॅन्सर रुग्णांसाठी झटणाऱ्यांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मी हे काम करीत असताना अचानक “ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान आणि तेही लॉकडाऊनच्या काळात; मात्र या काळात जर मी खचले तर गोरगरिबांना कोण मदत करणार? या विचाराने मन खात होते. अचानक कोठूनतरी बळ मिळाले आणि आजार विसरून असंख्य लोकांना मदतीचा हात दिला. पुण्यातील “माणुसकी’ संस्थेच्या माध्यमातून 400 ते 500 लोकांना रेशन दिले आहे. सध्या माझ्यावर केमोथेरपी सुरू असून आजारातून 70 टक्के बरी झाली असली, तरी माझे कार्य अविरतपणे सुरूच आहे.
-वंदनाताई सोनवणे, संस्थापक अध्यक्षा माणिकरत्न संस्था, आळंदी
कॅन्सर रुग्णांना मदतीचा हात द्या :
खाते नाव : माणिकरत्न मल्टीपर्पज सोशल सोसायटी
शाखा : कॉसमॉस बॅंक, आळंदी
खाते क्रमांक : 0110501072973
आयएफसी कोड : उजडइ0000011
संपर्क क्रमांक : 8625007778