कोलकाता : झारखंड विधानभेच्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने मिळवलेल्या यशाबद्धल समाधान व्यक्त करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, देशभर एनआरसी व नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून जोरदार निदर्शने सुरू असताना या राज्यातील जनतेने झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस-राजद यांच्या बाजूने मतदान करून आपला कल दाखवून दिला आहे. झारखंडच्या मतदारांनी नागरीकांच्या बाजूने कौल दिला आहे अशी टिपण्णीही त्यांनी ट्विटरवर केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे अशी हाक आता कॉंग्रेस नेत्यांकडून दिली जात असून त्याला ममता बॅनर्जी यांच्या अभिनंदनाच्या संदेशातून विधायक प्रतिसाद मिळाला असल्याची भावनाही कॉंग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.