नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालची परिस्थिती सांगत असताना ममता सरकारवर टीका केली. पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने “खुनी खेल खेला है..” असे धक्कादायक वक्तव्य केले होते. मोदींच्या त्या टीकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे. तुम्ही अशा पद्धतीने देश कसा काय चालवणार असा थेट सवालच ममता बॅनर्जींनी केला आहे.
मंत्र बॅनर्जी यांनी,’पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकारण पश्चिम बंगालला बदनाम करत आहेत. बंगालच्या लोकांनी कधीही विभाजनच्या राजकारणासमोर गुडघे टेकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना माणुसकी जपण्याचा संदेश द्यायला हवा होता. मात्र त्यांनी पश्चिम बंगालची बदनामी करायचं ठरवलं आहे. इथे येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त इथल्या भाजपा नेत्यांना खुश केलं. इथे येऊन मोदींनी बंगालचा अपमान केला असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या,“मणिपूर १०० दिवसांपासून जळतं आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरसारख्या छोट्या राज्यात कायदा-सुव्यवस्था राखू शकत नाही तर देश कसा चालवणार? जर ते बंगालला बदनाम करत राहिले आणि विभाजनाचं राजकारण करत राहिले तर देश कसा चालवणार? ” असे सवाल ममता बॅनर्जींनी विचारले आहेत. २०२१ मध्ये तुम्ही बंगालमध्ये हरलात, भाजपाचा २०२१ मध्ये पराभव झाला. त्यानंतर पंचायत निवडणुकांमध्येही पराभव झाला. मात्र तुम्ही हे कधी स्वीकारणार? असा प्रश्नही ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना विचारला आहे. भाजपात दहशतादी कारवाया वाढल्याचं तुम्ही म्हणता, पण हे सगळं सुरु कुणी केलं? असा सवालच त्यांनी केला आहे.
दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. देशात लोकशाही रुजवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. मात्र लोकशाहीची हत्या कुणी केली असेल तर ते ममता बॅनर्जींनी केली आहे असेही नड्डा म्हणाले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींर टीका करत उत्तर दिले आहे.