TMC Lok sabha candidate list : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंना उमेदवारी देत ममतांनी भाजपाला गुगली टाकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्हही खेळाडू भारताच्या विजयी वर्ल्डकप टीमचे सदस्य राहिलेले आहे. यातील एक 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या विश्वचषक टीममध्ये होता तर दुसरा खेळाडू २०११ मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या विश्वचषक टीममध्ये होता.
पश्चिम बंगालमध्ये होणारी लोकसभेची निवडणूक थेट ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी शाह अशी असणार आहे. त्यामुळे दीदींनी यावेळी जोरदार व्हिव रचना आखल्याचे समजते. नुकतच तृणमूलने जाहीर केलेल्या यादीत युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे. युसूफ यांना तृणमूल काँग्रेसने बहरामपूरमधून, तर कीर्ती आझाद यांना वर्धमान दुर्गापूरमधून तिकीट दिले आहे. | TMC Lok sabha candidate list
युसूफ काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध लढणार आहेत. युसूफ 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, तर कीर्ती आझाद हा 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होते. | TMC Lok sabha candidate list
युसूफ इरफान पठाणचा भाऊ
युसूफ हा आणखी एक माजी दिग्गज भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचा भाऊ आहे. तो सात वर्षे आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाचा युसूफ सदस्य होता. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अनेकदा भेट घेतली आणि त्यांचा गौरव केला. | TMC Lok sabha candidate list
कीर्ती आझाद यांनाही तिकीट
याशिवाय तृणमूल काँग्रेसने 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य कीर्ती आझाद यांनाही तिकीट दिले आहे. ते वर्धमान दुर्गापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. कीर्ती आझाद यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना 23 डिसेंबर 2015 रोजी पक्षाने निलंबित केले होते. | TMC Lok sabha candidate list
कीर्ती आझाद यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते धनबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढले होते, परंतु भाजपच्या पशुपती नाथ सिंह यांनी 4.8 लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये कीर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राजकारणातून निवृत्ती होईपर्यंत या पक्षासाठी काम करत राहीन असे सांगितले होते.
“त्यांनी तीन लाख लोकांना..” दिल्ली राज्यपालांवर आप सरकारचे गंभीर आरोप