मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जन चौपाल रॅलीसाठी बिजनौर येथे प्रत्यक्ष जाणार होते आणि तेथून ते प्रचार सुरू करणार होते. मात्र खराब हवामानुळे पंतप्रधान मोदींचा बिजनौर दौरा रद्द झाला आहे. त्यांनी आभासी माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यावरून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
आज पंतप्रधान मोदी बिजनौर येथे निवडणूक प्रचारसभेसाठी जाणार होते. त्यांनी खराब हवामानाचे कारण सांगत दौरा रद्द केला. खरंतर दिल्लीपासून बिजनौर पर्यंत सूर्य निघालेला आहे. कदाचित ते निवडणुकीच्या वातावरणाबद्दल बोलत आहेत, असं नवाब मलिक यांनी ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे.