मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता लती दीदींचं स्मारक उभारण्याची मागणी होत आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी कदमांनी केली आहे.
ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बांधाव. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे.
Maharashtra BJP MLA Ram Kadam writes to CM Uddhav Thackeray, requesting a memorial of veteran singer #LataMangeshkar, at Shivaji Park in Mumbai. She was cremated at the park yesterday with full state honours. pic.twitter.com/xkMDIVsJy7
— ANI (@ANI) February 7, 2022
याआधी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही शिवाजी पार्कवर उभारावं अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी तस झालं नाही. मात्र आता भाजपने मागणी केली असून यावर ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.