Bank Employees and Minister Nirmala Sitharaman| बँक कर्मचाऱ्यांना आता केवळ आठडयातील पाच दिवस काम करावे लागणार. तर रविवार आणि शनिवारी सुट्टी राहणार असल्याचा दावा मागील काही दिवसांपासून केला जात आहे. परंतु बँक कर्मचाऱ्यांचे हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अफवांवर लक्ष देऊ नका असं विधान निर्मला सीतारामन यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत केलं आहे.
बँकांमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आयआयटी गुवाहाटी येथे विकसित भारत या कार्यक्रमात त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. बँक कर्मचारी, बँकेतील कामकाज, वर्क कल्चर याविषयीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर 5 दिवसांच्या आठवड्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
इंडियन बँक असोसिएशन आणि इतर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनात करार
8 मार्च रोजी इंडियन बँक असोसिएशन आणि इतर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात एक करार झाला. मागील बऱ्याच काळापासून बँक कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा आठवडा असावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीला सदर करारामध्ये मान्यता दिली आहे.
ही मागणी प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. सध्या दर महिन्याचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र आता ही सुट्टी सरसकट करावी आणि सर्व शनिवार, रविवारी सुट्टी दिली जावी या मागणी संदर्भातील मंजूर घेतली जाईल यासाठी प्रयत्न केले जाणार होते.
त्यात बँक कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्यावर सहमती आली. विविध सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्के वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय महागाई भत्ता आणि अनुषंगिक लाभ यावर पण सकारात्मक चर्चा झाली. मात्र आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा:
भाजप लोकसभेचं तिकीट देणार का? उदयनराजे भोसले म्हणाले,’माझ्याकडे प्लेनचं, बसचं, रेल्वेचं तिकीटआहे…’