Dipali Sayyed । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी यांनी नाराजी दर्शवली आहे.
शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महायुती सरकारमध्ये राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडकीच्या तोंडावर बदलतांना दिसत आहे.
अशात दिपाली सय्यद भोसले या स्वःताच्याच पक्षावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमकी काय म्हणाल्या दीपाली सय्यद
‘लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावललं जातंय, ही गोष्ट खरी आहे. मात्र अबकी बार 400 पार हा नारा असल्यामुळे पक्षाने ती भूमिका घेतली असेल. त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. मी लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विधानसभेसाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच माझा मतदारसंघही जाहीर करेन, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत ४०० पार जागा जिंकण्याता नारा दिलाय. भाजपने यासाठी आतापर्यंत उमेदवारांच्या नावाच्या दोन याद्या जाहीर केल्यात. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची लोकसभा उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. भाजपच्या महाराष्ट्रातील यादीत २० पैकी ४ महिला उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
रावेरमध्ये रक्षा खडसे, बीडमध्ये पंकज मुंडे, जळगावात स्मिता वाघ आणि नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांना संधी देण्यात आलीये. यावरून लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात महिलांना डावलल जात असल्याचा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केला आहे. तसेच त्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.