पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्याचंच स्वागत करत विश्रांतवाडी परिसरातील ९ मस्जिद बंद करत सरकारच्या निर्णयाचा पालन करण्यासाठी मस्जिद ट्रस्टींचा जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
कोरोनामुळे सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे शासन कडक निर्णय घेत आहे. परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी शासन अनेक पातळीवर प्रयत्न करत आहे. सगळ्यांना घरी राहण्याचं आवाहन शासन सतत करत आहे.
दरम्यान, 21 दिवसाच्या लाॅकडाऊननंतर शहराची परिस्थिती कशी असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.