नीरा, (वार्ताहर) – महात्मा ज्योतिबा फुले यांनी अत्यंत अवघड कालखंडात मोठी जबाबदारी घेतली आणि महिलांसाठी शिक्षणाचे कवाडे खुली केली. त्यामुळे चूल आणि मुल सांभाळणारी महिला आज घराच्या बाहेर पडू शकली. त्यामुळे त्यांचे विचार आपण आंगिकरायला हवेत आणि ते पुढच्या पिढीलाही शिकवायला हवेत, असे प्रतिपादन नीरा गावाच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी केले आहे.
नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. 11) ग्रामपंचायत, समस्त माळी समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे,
माजी उपसरपंच दीपक काकडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे, अॅड. आदेश गिरमे, डॉ. वसंत दगडे, सुरेंद्र जेधे, संदीप जावळे, कांचन निगडे, अण्णा माने यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.