Maharashtra Weather Update : काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यांनतर पावसाने उघडीप दिली आणि राज्यातील तापमानात वाढ झाली. अनेक ठिकाणी पारा ३० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. मात्र आता पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला. वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. | Maharashtra Weather Update
तसेच, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल-किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. शनिवारी, १७ फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. | Maharashtra Weather Update
शेती, फळबागांवर परिणाम
काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने रब्बीचे पीक हिरावून घेतले आहे. सर्वाधिक नुकसान विदर्भातील शेतीचे झाले आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांत गारपीट झाली. यामुळे सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, कापूस, ज्वारी, भाजीपाला आणि फळबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. अनेक गारपीटग्रस्त गावे आधीच अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे.
‘मैं देश नहीं बिकने दूंगा..’ म्हणत मोदी देणग्यांसाठी देशाची संपत्ती विकायला तयार..”