पुणे – भारती विद्यापीठ जवाहरलाल तंत्रनिकेतनमध्ये (धनकवडी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांव्दारे “मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) हा उपक्रम राबवला गेला. यामध्ये स्वयंसेवकांनी माती कलशात एकत्रीत केली. ही माती स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना शिलास्मारक उभारण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य आर.आर. उत्तूरकर आणि उप प्राचार्य अमित पाटील, आर.एस. देशमुख , प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यकारी अधिकारी, स्वयंसेवक व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान नेमकं काय?
‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अभियानाला आजपासून (9 ऑगस्ट 2023) सुरुवात झाली आहे. सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली आणि 7 हजार 500 गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे.
‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतींमध्ये ‘शिलाफलकम’ स्मृती फलकही लावण्यात येणार आहेत.
या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ ही वेबसाइट देखील सुरू करण्यात आली, ज्यामध्ये लोक मातीचे किंवा मातीचे दिवे धरून सेल्फी अपलोड करू शकतात. हे कार्यक्रम स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणार आहेत.