मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बुधवारी (दि. 24) विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. यावेळी काही आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेवरून राज्यभरातून सर्व नेत्यांवर टीका केली जात आहे. राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय न घेता हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी एकमेकाविरोधात घोषणा देत भांडणं करत आहेत हे लाजिरवाणे आहे अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवरून हा सर्व गोंधळ उडाला होता. दरम्यान, आजदेखील सत्ताधारी आणि विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेल्या घोषणा…
सत्ताधाऱ्यांच्या घोषणा –
– खड्ड्यांचे खोके; मातोश्री ओके
– सचिन वाझेचे खोके; मातोश्री ओके
– लवासाचे खोके; बारामती ओके
– महापालिकेचे खोके; मातोश्री ओके
– जय श्रीराम जय जय श्रीराम
– जो हिंदू हित की बात करेंगा वही देश पर राज करेंगा
विरोधकांच्या घोषणा –
-पन्नास खोके… चिडलेत बोके
-गद्दार सरकारचा धिक्कार असो
-गाजर देणे बंद करा …ओला दुष्काळ जाहीर करा
-गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबणा-या सत्ताधारी पक्षाचा निषेध
-ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्ची खाली करा