Loksabha 2024 – वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत समावेशावरून रंगलेल्या नाराजीनाट्याचा अखेर होण्याची चिन्हं दिसत आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना देखील महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूकडील जागावाटप अद्याप अंतिम झालेलं नाही.
अशातच, महाविकास आघाडीसोबत लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये वंचित बहुजन आघाडी आजपासून अधिकृतरीत्या सामील झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे इंडिया आघाडीतील व महाविकास आघाडीतील स्थान यावरून गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य रंगले होते. त्याचा आज दोन्ही बाजूच्या नेत्यांमधील भेटीनंतर अखेर झाला आहे.
शिवसेना खासदार व महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Loksabha 2024)
“मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे आज महाराष्ट्र विकास आघाडी बैठकीत स्वागत करण्यात आले. वंचीत बहुजन आघाडी मुळे संविधान रक्षणाच्या लढ्यास बळ प्राप्त होईल. देशातील झुंड शाही विरोधात आम्ही एकत्र लढू! हा निर्धार पक्का!” अशी पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे.
मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे आज महाराष्ट्र विकास आघाडी बैठकीत स्वागत करण्यात आले.
वंचीत बहुजन आघाडी मुळे संविधान रक्षणाच्या लढ्यास बळ प्राप्त होईल.देशातील झुंड शाही विरोधात आम्ही एकत्र लढू! हा निर्धार पक्का!@AUThackeray @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @supriya_sule… pic.twitter.com/surFhhhpJb— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2024
१० ते १२ जागांवरील जागावाटप रखडले | Loksabha 2024
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी १० ते १२ जागांचे वाटप होणे अद्याप बाकी आहे. लोकसभा जागांच्या बाबतीत महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश (८०जागा) नंतरचे दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि शिवसेनेचे (ठाकरे) राऊत हे महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चा समितीचे सदस्य आहेत.
२०१९ लोकसभा निवडणुकांचे चित्र | Loksabha 2024
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात, भाजपला सर्वाधिक २३, फूट पाडण्यापूर्वीच्या शिवसेनेला १८, फूट पाडण्यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ तर काँग्रेस व एआयएमआयएमला प्रत्येकी १ जागा मिळाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
‘यंदा पंतप्रधान कोण व्हावा?’ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं