नागपूर – महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात किमान 4,872 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा दररोज सरासरी 23 मृत्यू आहे. 4,872 अर्भकांपैकी 795 (16 टक्के) श्वसनाच्या आजारांमुळे मृत्यू पावले.
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली. दरम्यान मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला आणि नंदुरबारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्रात या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 4,872 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या बाळांचे वय शून्य ते 28 दिवसांच्या दरम्यान होते. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर दररोज सरासरी 23 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 52 विशेष नवजात शिशु काळजी कक्ष कार्यरत आहेत. सर्व आजारी अर्भकांना सरकारी रुग्णालयात मोफत औषधे, चाचण्या आणि वाहतूक मोफत मिळते.