मुंबई – “एक फेब्रुवारी रोजी सादर होणार्या केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूप सार्या अपेक्षा असतील. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय योजनांद्वारे महाराष्ट्राला अधिकची मदत मिळणं अपेक्षित आहे. मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात सदरची मदत महाराष्ट्राला मिळत होती मात्र आता तसे चित्र दिसत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारकडून मांडण्यात येणार्या अर्थसंकल्पावर बोलताना पुढे ते म्हणाले की, पेट्रोल व डिझेलवर कर लावून या देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आणि त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फटका हा मध्यमवर्गीय व गोरगरीब जनतेला बसत आहे. त्यामुळे ते कर कमी करून आंतरराष्ट्रीय दरानुसार पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देणं, ही मोदी सरकारची प्रमुख जबाबदारी असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प हा पूर्णतः उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येईल. मात्र त्याला देशव्यापकतेचे चित्र दाखवून जनतेसमोर मांडण्यात येईल, असही मत त्यांनी यावेळी मांडलं.