मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑनलाइन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमकुवत आहे. विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्यात येण्याची शक्यता आहे. दहावीचे 16 लाख तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.