नांदेड : लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी गावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुण दत्ता भिंगोरे (वय,24) व शारदा माने (वय,25) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
तरुण व शारदा यांचे प्रेमसंबंध होते. तरुण हा अविवाहित असून शारदा विवाहित होती. मात्र आपल्या पतीशी पटत नसल्यामुळे चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथे ती वास्तव्याला होती याच ठिकाणी या दोघांचे सूत जुळले होते. परंतु दोघांच्या संबंधांची कुणकुण नातेवाईकांना लागली होती. शारदा ही विवाहित असल्यामुळे भिंगोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंधाला विरोध दर्शविला. तसेच दत्ताच्या घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. परंतु दत्ताने शारदासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या.
दोघांच्याही कुटुंबियांना तरुण व शारदाचे मान्य नव्हते त्यामुळे या विरहाच्या विचाराने दोघेही निराश झाले होते. एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.