दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल
मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीवरून देशभरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या कायद्यांविरोधात व समर्थनार्थ अशा दोन्ही प्रकारची आंदोलनं देशभरात सुरु आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली असून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीच्या समर्थनार्थ आज मनसेने मुंबई येथे ‘महामोर्चाचं’ आयोजन केलं आहे.
मनसेने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची ठोस भूमिका घेतली असून, याबाबत आज राज ठाकरे आझाद मैदानावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
ठळक मुद्दे
- राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले, डीसीपींच्या गाडीतून आझाद मैदानावर दाखल, थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार
- मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थ लागत नाही
- पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा
- पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होतात
- कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत.
- सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.
- माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
- अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे
- २०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.
- आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.