शेतकऱ्यांचे बोअरवेल आले गुळण्यावर उभे पिके वाया जाण्याची भिती
राजेंद्र वाघमारे
नेवासा – उन्हाळी पिकांसाठी मुळा धरणातून त्वरीत दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी भाजपाचे जिल्हा सचिव अंकुश काळे – पाटील व लाभधारक शेतकऱ्यांनी मुळा पाटबंधारे विभागाकडे एका निवेदनाव्दारे केली आहे लवकरच आवर्तन सोडले न गेल्यास आपण मुळा पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह अमरण उपोषण करणार असल्याचे काळे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
रब्बी हंगामातील उन्हाळी पिके जोमात असून ऐनवेळी पाण्याची पातळी खालवल्यामुळे हातातोंडाशी आलेले पिके वाया जाण्याचा अधिक धोका निर्माण झालेला असून धरणे भरलेली असतांना या पाण्याचा उपयोग आता शेतकऱ्यांना जनावरांना होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त केले जात अाहे.
लवकरच आवर्तन सोडल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मुळा पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की,पहिले रब्बीचे रोटेशन (पाणी) दि.७ जानेवारी २०२३ रोजी सोडलेले होते व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी बंद करण्यात आले.या कालावधीमध्ये शिरसगाव – १, सलाबतपूर – २,(शिरसगाव) या परिसरात १५ जानेवारी रोजी पाणी आले होते.परंतु त्याच दरम्यान नेवासा,तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याचा वादळाने गहु पडलेला होता शेतकऱ्यांनी पाणी घेतले नाही.
आज पाण्याची सर्व पिकांना व जनावरांना पिण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे पाणी सुटल्यानंतर हेड टु टेल शेतकऱ्यापर्यंत पाणी जाण्यास ५० ते ५५ दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे आता मुळा धरणातून त्वरीत पाणी सोडण्यात यावे अन्यथा आपण शेतकऱ्यांसह आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हा सचिव काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेनात दिला आहे.
धरणात पाणी पण… शेतकऱ्यांचे बोअरवेल आले गुळण्यावर अशीच वास्तव परिस्थिती असतांना उन्हाळी पिके सध्या शेतात जोमात उभे आहेत माञ ऐनवेळी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाणी गुळण्यावर आल्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडून अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.