अमोल मतकर
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचतींची निवडणुका होत आहे. नामनिर्देशन पत्र मागे आणि निवडणूक चिन्हे नेमून देणे तसेच अंतरिम याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. रात्रीचे 9 नंतरही जबाबदार अधिकारी घरी निघून गेल्याने कार्यालयाची आणि कामकाजाची सर्व जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांच्या भरवशावर टाकून गेल्याने कार्यालयाचे कामकाज रामभरोसे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सदस्यपदांसाठी १ हजार ३२५ तर सरपंच पदासाठी २५१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. बुधवारी (दि.७) नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस होता.
रात्री उशिरापर्यंत संगमनेर तहसील कार्यालयात कामकाज सुरू होते. रात्री नऊला कार्यालयात केवळ दोनच महिला कर्मचारी कर्तव्य पार पाडत होत्या. तहसीलदार अमोल निकम यांचा अपघात झाला आहे. त्यांच्यानंतर कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी नव्हते. त्यामुळे ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे कामकाज रामभरोसे सुरू आहे का? असाच प्रश्न पडला आहे.