लखनऊ – केंद्र सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
या व्हिडिओ मध्ये एक SUV गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातल्याचे दिसत आहे. मात्र ही गाडी कोण चालवत आहे हे दिसून येत नाही. व्हिडिओ मध्ये शेतकरी रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहेत. दरम्यान मागून एक काळ्या आणि मिलिट्री रंगाची SUV येते आणि शेतकऱ्यांना धडक देते यानंतर घटनास्थळी गोंधळ उडतो नंतर पुन्हा एक काळ्या रंगाची आणखी एक SUV येते आणि वेगात पुढे निघून जाते. या घटनेत 8 शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.
दरम्यान, लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनास्थळी मी आणि माझा मुलगा नव्हतोच असा दावा त्यांनी केला आहे.
या घटनेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी, तुमचं सरकार कुठल्याही ऑर्डरविना आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलं आहे. अन्नदाता शेतकऱ्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला आतापर्यंत अटक झाली नाही. असे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.