अकलूज -विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी श्रमसंस्कार शिबिर प्रेरणादायी ठरत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक गोष्टींची जाणीव होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलीस पाटील डॉ. सुभाष कटके-पाटील यांनी केले.
खंडाळी (ता. माळशिरस) येथे कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कटके पाटील बोलत होते.
यावेळी सरपंच बाबूराव पताळे, बाजार समितीचे संचालक हरिदास भोसले, प्राचार्य डॉ. अनिल भानवसे, शहाजी पताळे, रामचंद्र चव्हाण, कार्यक्रम अधिकारी महेश मिटकल, डॉ. मारूती गाडे, स्वप्नील राजे घाटगे, समाधान दुरापे, सुषमा शिंदे, विशाल मोरे, नितीन मोरे, लखन खरात, रणजीत वाघमारे उपस्थित होते.