दुबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा कोहली पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.
कोहलीने या सामन्यात जेव्हा 13 वी धाव काढली तेव्हाच त्याने या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 313 टी-20 सामन्यांतून 9 हजार 987 धावा होत्या. टी-20 सामन्यांमध्ये त्याने 5 शतके फटकावली असून, त्याने 73 अर्धशतकेही साकार केली आहेत.
दरम्यान, कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.