मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
यातच मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, ‘कालचे राज ठाकरेंचे भाषण भाजपने लिहून दिले होते. आम्हालाही लोकं विचारतात ‘लाव रे तो व्हिडिओ,’शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो.’
त्या पुढे म्हणाल्या,कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं” असं म्हणत पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली.