नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया दिल्लीतील सरकारी शाळांमधील शिक्षणाचे सतत गुणगाण करत असतात. या शाळांचा दर्जा प्रचंड सुधारला असल्यामुळे खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही त्यांचे पालक आता सरकारी शाळांमध्ये दाखल करत असल्याचा दावा हे दोन्ही नेते करतात. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीतील शाळांचा दर्जा जर इतकाच चांगला आहे, तर आम आदमी पक्षाच्या नेत्यांची मुले या शाळांमध्ये का शिकत नाहीत असा सवाल जोशी यांनी विचारला आहे. केजरीवालांना खोटे बोलण्याची सवय आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये त्यांनी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दिल्लीकरांसाठी त्यांनी काय केले अशी विचारणाही त्यांनी केली आहे.