इंदापूर :- देशाच्या स्वातंत्र्याला १५ ॲागस्ट रोजी ७५ वर्षे पुर्ण होत आहेत. यंदा १५ ॲागस्ट हा स्वातंत्र्यदिन ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणुन देशभरात साजरा केला जातोय. याच पार्श्वभुमीवर उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलीय.
उजनी धरणाच्या दरवाज्यांना ही विद्युत रोषणाई करण्यात आलीय. सध्या उजनी धरणातून एकूण ४१ हजार ६०० क्सुसेकने विसर्ग सुरू आहे.
यापैकी वीजगृहातून १६०० क्युसेक तर नदीपात्रात ४० हजार क्सुसेकने विसर्ग सुरू आहे.. उजनी धरण सध्या १०२.६७ टक्के म्हणजेच ११८.६६ टिएमसी भरले आहे.