नवी दिल्ली – देशातील भविष्य निर्वाह निधी वरील व्याज दरात केंद्र सरकारने पुन्हा कपात केली आहे. आता या निधीवरील व्याजदर गेल्या 40 वर्षांच्या नीचांकावर आला आहे. त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
मोदींना उद्देशून त्यांनी म्हटले आहे की, आपल्या घराचा पत्ता लोककल्याण मार्ग असा ठेवल्याने त्यातून लोकांचे कल्याण थोडेच होणार आहे? पंतप्रधानांनी सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरील व्याज दरात कपात करून त्यांना पुन्हा बर्बाद केले आहे. महंगाई बढाओ, कमाई घटाओ हे मॉडेल सकारने लागू केले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आज भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरात पुन्हा कपात करून हा व्याज दर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के इतका घटवला आहे. गेल्या चाळीस वर्षातील हा नीचांकी दर आहे. त्यावरून कामगार क्षेत्रातूनही मोठी ओरड सुरू झाली आहे.