मुंबई – नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या कंगना रनौत हिचं ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे कंगनाच्या वक्तव्यांना ब्रेक लागेल असं वाटत होतं. मात्र कंगनाने आता एका मुलाखतीत भारताच्या स्वतंत्र्याविषयी वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता कंगनावर एका अभिनेत्याने तिच्या विधानावरून निशाणा साधला आहे.
कंगनाप्रमाणे इतर बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेण्यासाठी केआरके अर्थात कमाल खान सर्वांना परिचीत आहे. केआरकेने यावेळी थेट कंगनाशी पंगा घेतला आहे. त्याने ट्विट करून कंगनावर टीका केली.
केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं की, “कंगना देशाच्या स्वातंत्र्याचा संबंध तिच्या स्वातंत्र्याशी जोडते का ? कारण कंगना म्हणते की तिला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले! त्याआधी ती हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती!”, असे ट्वीट करत केआरकेने कंगनाला ट्रोल केले आहे.
कहीं कंगना देश की आज़ादी को, अपनी आज़ादी से तो नहीं जोड़ रही है? क्योंकि #KanganaRanaut कहती है कि उसको 2014 के बाद आजादी मिली है! उससे पहले वो ऋतिक रोशन और अदित्य पंचोली की ग्रिफ्त में थी!🤪
— KRK (@kamaalrkhan) November 12, 2021
भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच तिला दिलेले राष्ट्रीय पुरस्कार तिच्याकडून परत घ्यावे, अशीही मागणी कऱण्यात येत आहे.