वाल्हे, (वार्ताहर) – कालीया खायेगा डोस की गोली, अकबर के राज्य में टी.बी. का इलाज अशा आशयाच्या पथनाट्याद्वारे टी. बी.बाबत वाल्हे परिसरात विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
आयसीएमआर नारी पुणे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व युवा आणि खेळ मंत्रालय भारत सरकार, आदर्श सामाजिक फाउंडेशन तसेच महर्षि वाल्मिकी विद्यालय वाल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने, क्षय रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध, निदान, उपचार आणि समुपदेशन कार्यक्रमांतर्गत, लोक सभागातून भारत सरकारच्या संशोधन केंद्रा मार्फत टी. बी विषयी जनजागृतीसाठी, मोहित राबविली जात आहे.
याअंतर्गत, महर्षि वाल्मिकी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे, आर. व्ही. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाल्हे परिसरातील, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, गायकवाडवाडी येथे मक्षयरोगफ रोग मुक्तीसाठी, सहा ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थीनी विद्यालयातील विद्यार्थी, अश्लेषा गायकवाड, प्रांजल चव्हाण,
गौरी शिंदे, अनन्या चव्हाण, शंभुराजे जाधव, चैतन्य पवार, ओम भुजबळ, आर्यन पवार, स्वराज गायकवाड, अथर्व लंबाते आदी विद्यार्थ्यांनी, क्षयरोगासंदर्भात ज्ञानवर्धन, पथनाट्याचे सादरीकरण केले. दरम्यान, सरपंच अतुल गायकवाड, आदर्श सामाजिक फाउंडेशनचे सचिव दादासाहेब राऊत, आशा सेविका सुनिता पवार, प्रिती राऊत आदींनी मोलाचे सहकार्य केले.