नवी दिल्ली – एका कार्यक्रमासाठी विदेशात जाण्यासाठी विमानतळावर गेलेल्या पत्रकार अय्युब राणा यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखले असून त्यांना विदेशात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लंडन येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज त्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पोहचल्या असतानाच तिथेच त्यांना इम्रिगेशन अधिकाऱ्यांनी अडवले.
त्यांच्या विरोधात ईडीने मनि लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात या आधीच लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्या आधारावर त्यांना रोखण्यात आले आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्या बाबत ईडीला कळवले. त्यानंतर ईडीचे अधिकारीही तातडीने विमानतळावर पोहचले.
त्यानंतर राणा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. आपले लंडन मधील कार्यक्रम पुर्व नियोजित होते त्यानंतर मी तेथून इटालीलाही जाणार होते. त्याची माहितीही मी आधीच जाहींर केली होती असे त्यांनी म्हटले आहे. मला विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले असून तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.