मध्य प्रदेश : भाजपचे मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुमानसिंग दामोर यांनी आज एका जाहीर सभेमध्ये बोलताना पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की एका जाहीर सभेला संबोधित करत असताना दामोर यांनी भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याच्या ओघात, “स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी जर नेहरूंनी हट्ट केला नसता तर देशाचे दोन तुकडे झाले नसते. एक वकील आणि विद्वान व्यक्ती असलेल्या मोहम्मद अली जिना यांना जर त्यावेळी पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला असता तर भारताचे दोन तुकडे झाले नसते.” असं वक्तव्य केलं.
दरम्यान, भाजप लोकसभा उमेदवाराच्या या वक्तव्यांनंतर आता विरोधी पक्षांकडून भाजपला काय प्रतिउत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
#WATCH Gumansingh Damor, BJP candidate from Ratlam-Jhabua LS seat: Azadi ke samay agar Nehru zidd nahi karte, to is desh ke 2 tukde nahi hote. Mohd Jinnah, ek advocate, ek vidwan vyakti, agar us waqt decision liya hota ki hamara PM Md. Jinnah banega, to is desh ke tukde nahi hote pic.twitter.com/w9mRk9K9ju
— ANI (@ANI) May 11, 2019