मुंबई – राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधान -परिषदेच्या 5 मतदारसंघातून आता 168 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपाचे नितीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ अकाेल्यात घेतलेल्या सभेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यावर खोचक टिका केली.
काय म्हणाले जयंत पाटील
‘महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. फडणवीसांना विराेधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गाेळ्यांना आम्ही अन् माताेश्रीही महत्त्व देत नाही.’