मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
तसेच शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जयंत पाटील सलग सहा वेळा आपल्या मतदार संघातून निवडणून आले आहेत. त्यानांतर छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच काँग्रेसने नेते आमदार बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि कुटुंबासह सिद्धिविनाय मंदिरात दर्शनासाठी गेले. आज रात्री कॅबिनेटची पहिली मिटिंग होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथम कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.