Ram Mandir : राममंदिरात रामललाच्या प्राणाला अभिषेक करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान म्हणून सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय आरएसएस प्रमुख मोहन भागवत,
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर सर्व पाहुणे अभिषेक विधीच्या वेळी गर्भगृहात उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाला संबोधित केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु होण्यापूर्वी त्यांनी आपला ११ दिवस केलेला उपवास महंत गोविंद देव गिरी यांच्या हस्ते सोडला. महंत गोविंद देव गिरी यांनी मंचावरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवस उपवास केला.
मोदींनी दिवसातून फक्त दोनदा नारळ पाणी घेतले. तर या उपवासारम्यान मोदींनी देशातील अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथे पूजाही केल्याचेही महंत गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
PM मोदींच्या उपवासाबद्दल महंत गोविंद देव गिरी क्या म्हणाले? पाहा…..
देशभरातील महापुरुषांशी चर्चा करुन आम्ही नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचे उपवास करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी अकरा दिवसांचे कठोर उपवास केले.
त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. महाभारतानुसार उपवास हे सर्वात मोठे तप आहे. हे तप करणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळणे सोपे नाही.
आम्ही त्यांना या दिवसांत विदेश प्रवास करण्याचे नाही म्हटले होते. त्यामुळे त्यांनी विदेश प्रवासही टाळला. परंतु देशाचा तिर्थस्थळांचा प्रवास केला. हा प्रवास नाशिकपासून सुरु केला.
त्यानंतर रामेश्वरम गेले. देशातील तिर्थस्थळांवर असणाऱ्या दिव्य आत्मांना बोलवून अयोध्यात या सोहळ्यासाठी आणले. आम्ही मोदी यांना तीन दिवस भूमी शयन करण्याचे सांगितले. परंतु त्यांनी अकरा दिवस भूमीशयन केले.