मुंबई – जेव्हा विरोधी पक्षाचा एकही खासदार संसदेत नव्हता तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या खासदारांचे राजीनामे घेऊन आडवाणी आणि अटलजींना निवडून आणण्याची व्यवस्था केली. लोकशाहीमध्ये विरोधक हवेत ही भूमिका काँग्रेसची राहिली आहे. परंतु विरोधकांचा सन्मान करण्याची भूमिका भाजपाची नाही हे भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
विरोधकांचा सन्मान करण्याची भूमिका भाजपाची नाही हे भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. #IndianDemocracy #bjpdestroyingdemocracy pic.twitter.com/5psXrruCn2
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 2, 2022
ते पुढे म्हणाले की, इंग्रजांना जो शरण जाईल ते जमीनदारी देऊन टाकायचे आणि विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करायचे. भाजपा देखील हेच करत आहे. एका प्रकारची अघोषित आणीबाणी 2014 पासून या देशात सुरू झाली आहे. अशी टीका देखील त्यांनी भाजप सरकारवर केली आहे.
एका प्रकारची अघोषित आणीबाणी २०१४पासून या देशात सुरू झाली आहे.#IndianDemocracy#bjpdestroyingdemocracy pic.twitter.com/4s35S8w3Oc
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 2, 2022
दरम्यान, देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. कॉंग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात केवळ भाजप राहील, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केले होते.