सातारा -सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, “”हा सत्याचा विजय आहे आम्ही जनतेत जाऊन काम करतो. जनता आमच्यासोबत आहे हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.’
उद्धव ठाकरे आणि विरोधक सांगत होते आमचे आमदार व मुख्यमंत्री अपात्र होणार आणि सरकार कोसळणार. आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास होता, असे सांगून देसाई यांनी “संजय राऊत यांच्या बोलण्याकडे आम्ही कधीच लक्ष देत नाही कारण ते सातत्याने अनाठायी बडबड करतात, असे उत्तर एका प्रश्नावर दिले. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळेच त्यांचे सरकार गेले हे न्यायालयाचे निरीक्षण आहे. आमचं सरकार बहुमतातील आहे, त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.