मुंबई – मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. यातच आता ‘इश्कबाज’ फेम अभिनेता मल्हार पांड्या लग्नाच्या 9 वर्षानंतर पत्नी प्रिया पाटीदारपासून विभक्त होणार आहे. त्याने 2014 मध्ये गायिका, प्रिया पाटीदारशी लग्नगाठ बांधली होती. मागील काही दिवसांपासून ते वेगळे राहत होते. अखेर लग्नाच्या नऊ वर्षानंतर हे जोडपे घटस्फोट घेणार आहे.
मीडीया रिपोर्टनुसार, दोघेही वर्षभरापूर्वी वेगळे राहत होते. लॉकडाऊन दरम्यान दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सध्या ते वेगळे राहत असूनते एकमेकांशी बोलतही नाहीत, एकमेकांच्या संपर्कातही नाहीत. त्यामुळे आता प्रिया आणि मल्हार या वर्षाच्या शेवटी घटस्फोट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मल्हार शेवटचा टीव्हीवर 2020 मध्ये राधाकृष्णमध्ये दिसला होता. दरम्यान, इश्कबाज अभिनेताही आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. सूत्राने सांगितले की, त्याच्या तिथे जाण्याचे एक कारण म्हणजे त्याच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यापासून विश्रांती घेणे, मग ते त्याचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवन असो. त्यांची कुटुंबे एकमेकांशी जोडलेली आहेत आणि त्यांना त्यांच्या निर्णयाची जाणीव आहे.
याबाबत मल्हारशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, अलीकडेच विक्रम माँट्रोजच्या ‘तसवीर’ या गाण्यात गायलेल्या प्रियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता आम्ही एकत्र नाही हे खरे असल्याचे म्हणत तिने यावर अधिक बोलणे टाळले.