नवी दिल्ली – चीनने आपली जी जमीन बळकावली आहे ती परत घेण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? का ती पण देवाची करणी म्हणून सोडून देणार आहात, असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
चीनने आपली जमीन बळकावली आहे, ती परत घेण्याचा भारत सरकार नेमका कधी प्रयत्न करणार आहे, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
गेले काही दिवस राहुल गांधी हे सातत्याने चीन सीमेवरील तणावाच्या संबंधात मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. चीनने भारताची जमीन बळकावलेली नाही अशी भूमिका सरकारने घेतल्यानंतर त्यांनी त्या भागातील लोकांच्या प्रतिक्रिया आणि तेथील सॅटेलाईट द्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांद्वारे सरकारचा हा दावा कसा फोल आहे, यावर प्रकाश टाकला होता.
आता त्यांनी निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेची बिघडलेली स्थिती ही देवाची करणी असल्याचा जो उल्लेख केला होता त्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.