मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या कोणत्याही मोसमातील पहिल्या तीन सामन्यांत ऋतूराज गायकवाडची बॅट तळपलेली नाही. हाच योग यंदाही जुळून आला आहे. यंदाच्या मोसमातील पहिल्या तीनही लढतींत त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. मात्र, गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता चौथ्या सामन्यापासून तो भरात येइल, असा विश्वासही चेन्नई सुपर किंग्जच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत झालेल्या पहिल्या तीनही लढतीत त्याने 0, 1, 1 अशा धावा केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या मोसमाप्रमाणे हा अनोखा पण नामुष्कीजनक योगायोग मागे टाकून पुढील सामन्यांपासून त्याची मोठी खेळी होइल, असा विश्वासही संघ व्यवस्थापनाने व कर्णधार रवींद्र जडेजाने व्यक्त केला आहे.