IPL 2024, Live Cricket Score, RR vs MI : आज आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 18.4 षटकांत एक गडी गमावून 183 धावा केल्या आणि सामना नऊ विकेटने जिंकला.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 60 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 7 षटकार आले. कर्णधार संजू सॅमसन 38 धावा करून नाबाद परतला.जोस बटलर 25 चेंडूत 35 धावांची खेळी केल्यानंतर बाद झाला.
या सामन्यातून नुवान तुषाराने आयपीएलमध्ये पदार्पण केले, मात्र त्याने अवघ्या 3 षटकात 28 धावा दिल्या. फलंदाजीनंतर हार्दिक पांड्या गोलंदाजीतही फ्लॉप ठरला अन् एकही विकेट घेऊ शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांची धारदार गोलंदाजीही यावेळी मुंबईसाठी फार काही करू शकली नाही. मुंबईसाठी एकमेव विकेट पियुष चावलाने घेतली, ज्याने 4 षटकात 33 धावा दिल्या.
यासह राजस्थान रॉयल्सने सातवा विजय मिळवला आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचे स्थान मजबूत झाले आहे. संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. संघाच्या खात्यात सहा गुण आहेत.
तत्पूर्वी, राजस्थानविरूध्द नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम खेळताना 20 षटकात 9 बाद 179 धावा केल्या होत्या. एमआयची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या सामन्यात इशान किशनला एकही धाव करता आली नाही, तर दुसरीकडे रोहित शर्माने 6 धावा केल्या.
Yuzi bhai’s 200th IPL wicket and 5 for Sandeep coming off an injury! 👏💗 pic.twitter.com/nK25C0dsP4
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2024
या सामन्यात सूर्यकुमार यादवची जादूही चालू शकली नाही कारण संदीप शर्माने त्याला 10 धावांवर बाद केले. 52 धावा झाल्या तोपर्यंत मुंबईने 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु येथून निहाल वढेरा आणि तिलक वर्मा यांच्यातील शानदार 99 धावांच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सला सामन्यात परत आणले. वढेराने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावांची शानदार खेळी खेळली.
एकवेळ मुंबई इंडियन्स 13 षटकांत 4 विकेट गमावून 101 धावांवर खेळत होती. येथून फलंदाजांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. 17व्या षटकात निहाल वढेरा बाद झाला असला तरी टिळक वर्माने आपली अर्धशतकी खेळी सुरूच ठेवली होती. 13व्या षटकानंतर पुढील 5 षटकांत संघाच्या 69 धावा झाल्या होत्या. मुंबई 200 धावा सहज पार करेल असे वाटत होते पण शेवटच्या 2 षटकात RR कडून तगडी गोलंदाजी झाली. पहिल्या 19 व्या षटकात आवेश खानने केवळ 6 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात संदीप शर्माने 3 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेऊन मुंबईला 179 धावांवर रोखले.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी…
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. मुंबईने पहिल्या 4 विकेट 52 धावांत गमावल्या होत्या. मात्र आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांची मधल्या षटकांमध्ये चांगलीच धुलाई झाली. आरआरसाठी संदीप शर्माने 4 षटकात 18 धावा देताना सर्वाधिक 5 आणि ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले. याच सामन्यात मोहम्मद नबीची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 200 विकेट पूर्ण केल्या आहेत, पण त्याने 4 षटकात 48 धावाही दिल्या आहेत. त्याच्याशिवाय आवेश खाननेही महत्त्वाची 1 विकेट घेतली.