Live Cricket Score, RR vs GT, Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 24 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
RR vs GT Live Score : पावसामुळे टॉसला विलंब…
गुजरात जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. मैदानावर हलका पाऊस पडत असल्याने नाणेफेकीसह सामना सुरू होण्यास (Toss) उशीर होणार आहे. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदानाचा काही भाग कव्हरने झाकला गेला. आयपीएलने सोशल मीडियावर एक्सच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे.
🚨 Update from Jaipur 🚨
The toss of the #RRvGT game has been delayed due to rain 🌧️
Stay tuned for further updates!
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch #TATAIPL pic.twitter.com/61tdhh2FvF
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
आयपीएल 2024 मध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जयपूरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. राजस्थान आणि गुजरात यांच्यात होणारा सामना खूपच रंजक ठरू शकतो. आता पावसामुळे दोन्ही संघांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू स्किट होईल. याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. जमिनीवर हलके पाणी असेल. याचा परिणाम क्षेत्ररक्षणादरम्यान होईल.
राजस्थान आणि गुजरात ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यातील संघर्ष आणि आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. गुजरातने यापैकी चार सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र, गुजरातने जे चार सामने जिंकले ते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली होते. आता तो मुंबईच्या संघात गेला आहे.
शुभमनच्या नेतृत्वाखालील गुजरात संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यांत त्यांचे आठ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. त्याच वेळी, चार संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन संघांचे प्रत्येकी चार गुण आणि तीन संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. अशा स्थितीत या वेळी अंतिम चारमध्ये पोहोचण्याची लढत अत्यंत रंजक असणार आहे.