मुंबई – शेअर बाजार निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहणार आहेत. या काळात गुंतवणूकदार कंपन्यांच्या ताळेबंदाकडे लक्ष देतील. करोनाविषयक परिस्थिती कशी राहील, पावसाचे प्रमाण किती आहे, याकडेही गुंतवणूकदार लक्ष देऊन आपले गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सरलेल्या आठवड्यात इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या बाजारमूल्यात 98 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. मात्र आता गुंतवणूकदार विविध घटनाक्रमांकडे लक्ष देतील असे ब्रोकर्सना वाटते.