माझ्यासाठी समाजकारण म्हणजे वंचितांना मदत आणि प्रभागाचा विकास करणे होय. हा जनसेवेचा वसा मी व माझे पती दोघेही मिळून सुरू ठेवू. आमच्या कुटुंबाची समाजकारणातून जनसेवा करण्याची पंरपरा आहे. यासाठी मी आणि माझे पती कटिबद्ध आहे.
– माया संतोष बारणे.
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील नागरिकांनी एका महिलेच्या हाती कारभार देत तिला नगरसेविका केले. त्याच महिलेने आज थेरगावचा कायापालट केला. पतीच्या भक्कम साथीने त्या माऊलीने थेरगावमध्ये विकासकामांची अक्षरशः लाट आणली. त्या कार्यक्षम नगरसेविका अर्थातच मायाताई संतोष बारणे.
2017 मध्ये महापलिकेच्या निवडणुकीत थेरगावच्या जनतेने मायाताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. कारण नागरिकांना हवा होता तो थेरगावचा विकास. नागरिकांचा हाच विश्वास मायाताईंनी सार्थकी लावला. आज थेरगावचे रुप पालटले असून थेरगावामध्ये विकासाची गंगा वाहू लागली आहे. थेरगावच्या गुजरनगर येथील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मायाताईंच्या लक्षात आला. त्याठिकाणी 25 लाख लीटर क्षमतेच्या भव्य जलकुंभाचे बांधकाम त्यांनी केले.
आपला प्रभाग हा सर्व सोयी-सुविधांयुक्त असावा हे मायाताईंचे स्वप्न. त्यामुळेच त्यांनी रस्ते, पदपथ, बगीचे यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी थेरगावमधील डांगे चौकामध्ये ग्रेडसेपरेटरचे काम केले. तसेच मंगलनगर ते वाकड पोलिस स्टेशनपर्यंतचा 24 मीटर रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करून त्याचे सुशोभीकरण केले. त्याचप्रमाणे पवनानगर ते थेरगाव फाटा येथील रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरण केले आहे.
विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
महिलांचे कार्य खूप मोलाचे आहे. त्यांनी केलेला त्याग, केलेले कार्य खूप महत्तवाचे आहे. त्यामुळे प्रभागातील महिलांच्या न्याय हक्कासाठी मायाताई नेहमीच जागृत असतात. महिला मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो तिचा सन्मान झालाच पाहिजे अशी मायाताईंची भूमिका. त्यासाठीच त्या आपल्या प्रभागातील धुणीभांडी करणाऱ्या महिलांचा दरवर्षी सन्मान करतात.
महिलांबद्दल बोलताना मायाताई सांगतात, की
हजारो फूल चाहिए एक माला
बनाने के लिए
हजारो दीपक चाहिए, एक आरती
सजाने के लिए
हजारो बूंद चाहिए समुद्र
बनाने के लिए
पर एक स्त्री अकेली ही काफी है,
घऱ को स्वर्ग बनाने के लिए
गगनभेदी नजर ज्यांची
पहाडासम विशाल काया
धकधकता सुर्यही झुकतो
आणि वंदितो प्रभु शिवराया
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच जाज्वल्य इतिहास मांडण्यासाठी मायाताईंनी डांगे चौक याठिकाणी महाराजांच्या जीवनपटावरील शिल्प उभारले आहेत. शहरातील खेळाडूंसाठी थेरगावमधील आनंदवन सोसायटी शेजारी अद्यावत क्रीडांगण उभारले आहे. त्यामध्ये इनडोअर गेमसाठी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. तसेच कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांसाठी स्वतंत्र मैदानाची व्यवस्था केली आहे. थेरगावमध्ये महिलांसाठी शहरातील पहिला भव्य बंदिस्त जलतरण उभारण्याची किमया देखील मायाताईंनी साधली आहे. पुढच्या 50 वर्षांचा दृष्टीकोन समोर ठेवून मायाताईंनी प्रभागामध्ये विकासकामे केली आहेत. नागरिकांच्या मदतीला धावून जाणे आणि शहराचा विकास करणे हा त्यांचा स्थायीभाव. त्याच जोरावर आज मायाताईंने राजकारणामध्ये यश संपादन केले आहे.