कोलकाता : कर्णधार विराट कोहलीच्या दमदार शतकी आणि पूजारा व रहाणेंच्या अर्धशतकीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात २४१ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार कोहलीने भारताचा पहिला डाव ९ बाद ३४७ वर घोषित केला.
Innings Break!#TeamIndia have declared with a total of 347/9 on the board. Lead by 241 runs.#PinkBallTest #INDvBAN pic.twitter.com/XDSTNTytjw
— BCCI (@BCCI) November 23, 2019
कालच्या ३ बाद १७४ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारतीय संघाने आज १७३ धावांची आणखी भर टाकली. कोहली आणि रहाणे यांनी आज खेळताना चौथ्या विकेटसाथी ९९ धावांची भागिदारी केली. रहाणे ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने कसोटीतील २७ वे शतक झळकावले. कोहलीचे हे भारतीय कसोटी कर्णधार म्हणून २० वे, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील (कसोटी व एकदिवसीय) ७० वे तसेच दिवस-रात्र कसोटीतील पहिले शतक ठरले.
विराट १३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा १२, अश्विन ९, उमेश यादव ०, इशांत शर्मा ० धावा काढून बाद झाले. भारताने पहिला डाव घोषित केला तेव्हा ञध्दिमन साहा १७ तर मोहम्मद शमी नाबाद १० धावांवर खेळत होते.
बांगलादेशकडून अल-अमीन होसैन आणि एबादत होसैनने सर्वाधिक ३ गडी बाद केले. अबू जाएदने २ तर तैजुल ईस्लामने १ गडी बाद केला.