नवी दिल्ली – जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि जास्त सामान घेऊन जात असाल तर आता तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. वास्तविक, आता रेल्वे अधिक माल घेऊन जाण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामध्ये लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रेल्वे प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन जाऊ नका. तसे असल्यास ते लगेज व्हॅनमध्ये नक्कीच बुक करा”
कोचप्रमाणे मर्यादा निश्चित –
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वे प्रवासी त्यांच्यासोबत रेल्वेच्या डब्यात 40 किलो ते 70 किलो वजनाचे सामान ठेवू शकतात. यापेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना वेगळे भाडे द्यावे लागेल. रेल्वेने प्रत्येक डब्यानुसार (कोच) वजन निश्चित केले आहे. स्लीपर क्लासमध्ये प्रवासी 40 किलोपर्यंत वजन असलेले सामान नेऊ शकतात. AC-2 टियरमध्ये, 50 किलोपर्यंतचे सामान नेण्याची परवानगी आहे. तर फर्स्ट क्लास एसीमध्ये जास्तीत जास्त 70 किलो वजनाचे सामान सोबत नेले जाऊ शकते. निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वजनाचे सामानासाठी रेल्वे प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते.
काय असेल दंड –
माहितीनुसार, जर एखादा प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करताना आढळला, तर त्याला स्वतंत्रपणे सहापट बॅगेज रेट द्यावा लागेल. म्हणजेच, जर कोणी 40 किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन 500 किमी प्रवास करत असेल, तर प्रवासी फक्त 109 रुपये देऊन लगेज व्हॅनमध्ये बुक करू शकतात. दुसरीकडे, प्रवासादरम्यान प्रवासी अधिक सामानासह पकडले गेल्यास त्याला 654 रुपये दंड भरावा लागणार आहे.
प्रतिबंधित वस्तू बाळगण्यावर कारवाई –
रेल्वेने प्रवास करताना प्रतिबंधित वस्तू बाळगणे गुन्हा आहे. पॅसेंजर पुढील वस्तू रेल्वेस सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यामध्ये गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, ओले चामडे, तेल, ग्रीस, तूप, अशा वस्सू ज्यांच्या तुटण्यामुळे किंवा टपकल्याने प्रवाशांना इजा होऊ शकते, यांचा समावेश आहे. नियम तोडून प्रवाशांनी या प्रतिबंधित वस्तू घेऊन प्रवास केल्यास रेल्वे कायद्याच्या कलम 164 अन्वये प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.