अहमदाबाद – दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली असली तरीही आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यातील विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारत व इंग्लंड या दोन्ही संघात चांगलीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, भारत वि. इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
England have won the toss and they are having a bowl first in the third #INDvENG T20I.
🇮🇳
IN: Rohit Sharma
OUT: Suryakumar Yadav🏴
IN: Mark Wood
OUT: Tom Curran pic.twitter.com/EXZ5TXB6Ls— ICC (@ICC) March 16, 2021
हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष
दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या कामगिरीकडे आता लक्ष लागले आहे. पंड्यासारखे खेळाडू सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देऊ शकतात. पंड्या हा आक्रमक फलंदाज असल्यामुळे 6 ते 15 या षटकांच्या मध्ये षटकामागे 10 किंवा 12 च्या सरासरीने धावा करणे त्याला कठीण नाही. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात त्याची फलंदाजी पाहता त्याला अद्याप सूर गवसलेला नाही. आता या मालिकेतील उर्वरीत तीनही सामन्यात त्याची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरणार आहे.